लहान बाळांची काळजी

लहान बाळांची काळजी

आयुष्यात नुसत्या उंची व वजनावर यशस्वी होता येत नाही. वजन हे वाढीचे परिमाण असू शकत नाही. बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे कान सूक्ष्म ऐकू येईल असे बनत आहेत का, सूक्ष्म वास त्याला येतो की नाही, त्याला चव कळते की नाही, त्याची जागरूकता किती आहे, त्याचे मल-मूत्र विसर्जन कसे आहे, याही गोष्टी तितक्‍याच महत्त्वाच्या असतात. त्यासाठी आईचे दूध तान्ह्या बाळाला द्यायला हवे. आईच्या दुधापाठोपाठ गाईचे दूध अप्रतिम समजले जाते.

अन्नामुळे शरीर तयार होते असे आपण म्हणतो. बाळाने शरीर नीट धरावे, त्याचा योग्य विकास व्हावा व बाळ पटपट मोठे व्हावे असे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येक वस्तूच्या वाढीचा एक ठराविक वेग असतो. त्या वेगापेक्षा अधिक वेगाची अपेक्षा करणे बरोबर नाही. त्याची योग्य वाढ होण्यासाठी शरीराची वाटचाल नैसर्गिक प्रकारे व्हावी. यासाठी जे इंधन म्हणजेच अन्न द्यावे लागते त्याचा विचार करायला हवा.

तीन महिन्यांत उंची वाढून आपले मूल सर्वांत स्मार्ट दिसावे हे म्हणणाऱ्यांनी रोपटे वाढत आहे का हे पाहण्यासाठी कुंडीत लावलेले रोप पुन्हा पुन्हा ओढून पाहण्यासारखे आहे. रोपाला भलतेच खत घातले तर नैसर्गिक वेगापेक्षा अधिक वेगाने वाढल्यासारखे दिसेलसुद्धा, पण त्याची ताकद कमी पडेल व त्याचा नाश होण्याची वेळही जवळ येईल. प्रत्येक गोष्टीचा काळ-काम-वेग ठरलेला असतो.

बाळ धष्ट-पुष्ट असावे, त्याची वाढ नीट असावी हे म्हणत असताना बहुतेक पालक बाळाची उंची व वजन मोजत राहतात. पण उंचीतील व वजनातील वाढ पुढे आयुष्यात नकोशी होणार आहे हेही लक्षात घ्यायला हवे. आयुष्यात नुसत्या उंची व वजनावर यशस्वी होता येत नाही. जपानी कुस्तीगीर आपले वजन कसे वाढेल याच्या प्रयत्नात असतात असे दिसते, पण हा अपवाद आहे. वजन हे वाढीचे परिमाण असू शकत नाही. बाळाची दृष्टी तेज आहे का, बाळाचे कान सूक्ष्म ऐकू येईल असे बनत आहेत का, सूक्ष्म वास त्याला येतो की नाही, त्याला चव कळते की नाही, त्याची जागरूकता किती आहे, त्याचे मल-मूत्र विसर्जन कसे आहे, याही गोष्टी तितक्‍याच महत्त्वाच्या असतात. म्हणून बाळाच्या आहाराची योजना करत सर्व गोष्टींची योजना करणे आवश्‍यक ठरते.

तान्ह्या बाळासाठी आईचे दूध हा सर्वांग परिपूर्ण आहार ठरतो. आईच्या दुधाला तोड नाही. आईचे दूध बाळाला पचत नाही असे सहसा होत नाही. बाळाला आईच्या दुधाची ऍलर्जी आहे असे म्हणून बऱ्याच वेळा बाळाला बनावटी दूध दिले जाते. नंतर जरा मुले मोठी झाली की दुधात अमुक घातल्याने स्मरणशक्‍ती वाढेल, तमुक घातल्याने उंची वाढेल, हे घातले की बुद्धी वाढेल असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. पण त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. स्पर्धेचे जग असले तरी प्रत्येकाला पहिले येता येत नाही. आणि मुख्य म्हणजे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यातच खरे यश असते; याही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात.

बोटाला थेंबभर मध लावून अधून मधून बालकाच्या जिभेवर चोळल्याने त्याच्या रक्‍तशुद्धीसाठी, रक्‍ताभिसरणासाठी मदत होते व त्याला मधाच्या चवीचाही आनंद मिळविता येतो. बाळाला आईचे दूध चालू असताना आईचा आहार सकस व षड्रसपूर्ण असावा, केवळ जिभेला चटकदार अन्न नसावे. आईच्या आहारात असे चटकदार अन्न असले तर बालकाचे पोट फुगणे, लाळ गळणे, उलटी होणे, शौचाला पांढरी होणे, शौचाला न होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे बालक आईचे स्तन्यपान करत असेपर्यंत मातृप्रेम पूर्णत्वाने विकसित असावे. स्वतःच्या चैनीसाठी पण बालकाच्या अकल्याणाचे असे काहीही हातून घडणार नाही यासाठी दक्ष असावे.

बाळाला आईचे दूध सोडल्यानंतर बाहेरचे दूध देण्याची सुरवात करताना त्यात साखर वगैरे मिसळण्याची गरज नसते. बालकाला बाहेरचे दूध सुरू केल्यावर त्याच्या वेळा ठराविक असाव्यात. बालकाला रोज नव्या नव्या चवीचे पदार्थ लागतात असे नव्हे. तेव्हा त्याला नको नको ते वेगवेगळे पदार्थ खायला देणे बरोबर नसते.

बाहेरचे दूध बाळाला पचत नाही असे होण्याचे कारण म्हणजे ते दूध भ्रष्ट असते. गाईला किंवा म्हशीला नको नको ते पदार्थ खाऊ घातलेले असतात. गायी-म्हशीपासून दूध थोडे जास्त यावे या हेतूने तिला हॉर्मोन्सची इंजेक्‍शन देण्यात येतात. तिला अति पौष्टिक आहार देण्यात येतो, जेणेकरून असे दूध बाळाला जड पडल्यामुळे पचत नाही. यावरचा सोपा इलाज असा की दुधाच्या पावपट पाणी, चिमूटभर सुंठीचे चूर्ण व चिमूटभर वावडिंग पूड टाकून मंद आचेवर उकळावे. वरून घातलेल्या पाण्याच्या यातील 20 टक्के पाणी उडून जाईपर्यंत (म्हणजे पाच टक्के पाणी आत राहील) दूध उकळावे. हे दूध गाळून घेऊन बाळाला पाजल्यास बहुतेक वेळा बाळाला पचते.

बाळाची वाढ नीट व्हावी या हेतूने बरेचसे चाटण्यासारखे पदार्थ बाळाला देण्यास सुचविण्यात येते. यापैकी कशाचा किती उपयोग होतो हे पाहण्यासाठी घरात एक डॉक्‍टर कायमसाठी हजर हवा म्हणजे ते मूल डॉक्‍टरचेच हवे. ज्याअर्थी बाळाला असे काही खाऊ घातलेले आहे त्याअर्थी त्याचा विकास उत्तम होत आहे असा भ्रम करून घेतला तर पुढे अडचण येऊ शकते. कशाची तरी पेस्ट करून बाळाला खाऊ घालणे बरोबर नसते.

बाळाचे उष्टावण वेळच्या वेळी व्हावे. बालकाच्या उष्टावणीच्या वेळीसुद्धा रव्याची दूध व साखर घालून केलेली खीर देण्याची पद्धत आहे. त्याला एकदम चिवडा-चकलीसारखे पदार्थ दिले जात नाहीत. उष्टावणीनंतर काही दिवसांनी बालकाला दात आल्यावर कडक असले तरी पटकन मोडले जाणारे खुसखुशीत पदार्थ दिले जावेत. जेणेकरून नव्याने आलेल्या दातांना, त्यांच्या मुळांना त्रास होणार नाही. बालकाचे अन्न हे चतुर्विध असावे असे सांगितलेले आहे, ज्यामुळे बाळाचे धातू पुष्ट होतात. असे असताना बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत त्याला मिक्‍सरमध्ये बारीक केलेले अन्न चमच्याने किंवा पातळ करून दुधाच्या बाटलीने देण्याने केवळ बाळाच्या प्रकृतीत बिघाड होऊ शकतो.

आईच्या दुधापाठोपाठ गाईचे दूध अप्रतिम समजले जाते. सध्या हेही सिद्ध झालेले आहे की दूध हे गीर, कांकरेज, पंढरपूर वगैरे देशी वंशाच्या गाईचे असावे. या गाईंना शक्‍यतो चारा खाऊ घातलेला असावा, तिला मीठ चाटवलेले असावे, कडबा दिला तरी तिच्या पोटाला भार होईल एवढ्या प्रमाणात दिलेला नसावा. अशा गाईचे दूध बालकाला सहज पचते, त्याच्या शरीराचाच विकास होण्याबरोबर त्याच्या मेंदूचा विकास योग्य होतो, त्याचा मेंदू संवेदनशील व उत्तम बौद्धिक क्षमता असणारा असतो.

नैसर्गिक वस्तूंमधून शरीराला लागणारे सर्व घटक मिळविणे ही प्रक्रिया लहान मुलांच्या अंगवळणी पडली की पुढे सुद्धा खाल्लेल्या पदार्थांमधून शरीराला आवश्‍यक असणारे घटक मिळत राहतात. अशी सवय नसली की म्हातारपणी त्रास होऊ शकतो. शरीरात अमुक व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, तमुक धातू कमी आहे असे लक्षात आल्याने आहाराचे नियोजन करणे कठीण होऊन बसते. Cp from another group

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .