*✍🏻🖥🎞📽॥ जिवनामृत ॥🎥🎞🖥✍🏻*
*✍🏻🖥🎞📽॥ जिवनामृत ॥🎥🎞🖥✍🏻*
*जिवनामृत* या सदराखाली आज खास दीवाळी निमित्त *ह्रदयस्पर्षी लेख* लिहित आहे........✍🏻
विषय : *कृतज्ञता............✍🏻*
▫मी आज तुम्हांला चित्रपटातील हिरो व जगावर आधीराज्य करणारा सुपरस्टार, खर्या जिवनातही कसा सुपरहिरो आहे ते सांगणार आहे . . .
▫अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी 1984 सालची हि गोष्ट . . .
▫त्या काळातील नावाजलेले सुपरहीट डायरेक्टर-प्रोड्युसर व निर्देशक प्रकाश मेहरा हे सन 1982 ते 1984 च्या दरम्यान प्रचंड आर्थिक नुकसानीत होते . . .
▫गाडी, बंगला व इतर संपत्ती सर्व गहाण पडले होते . . .
▪राजाचा रंक कसा व कधी होईल हे अनेकांना न समजणारी गोष्ट आहे . . .
▫या वरिल वाक्याप्रमाणेच प्रकाश मेहरा यांचे झाले होते . . .
▫प्रचंड कर्जाच्या ओझ्याने सर्व बाजूने दबाव व मार्केटमधील कमी होत चाललेली पत पाहता प्रकाशजींना जगणे मुश्किल झाले होते . . .
▫परंतू प्रकाश मेहरा हार मानणार्यांपैकी नव्हते . . .
▫एक दिवस त्यांना एक पटकथा समोर आली, त्यांना ती खुप आवडलीही, पण या पटकथेला शोभणारा व योग्य न्याय देणारा हिरो असावा तर फक्त अभिताभ बच्चनच . . .
▫असे त्यांना मनोमन वाटले, पण अमिताभ बच्चन तर सुपरस्टार आहे? त्यांच्याकडे अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट आहेत आणि आपल्याला त्यांचे मानधन द्यायला जमेल का?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले . . .
▫या आधी अमिताभ बच्चन यांना बरोबर घेऊन अनेक चित्रपट केलेले होते. प्रकाश मेहरांनी निर्देशित केलेल्या अनेक चित्रपटांमुळेच अमिताभ हे सुपरस्टार झाले होते. प्रकाश मेहरांनी जंजिर या चित्रपटात प्रथम भुमिका दिली होती व तिथून पुढेच अमिताभजींचे सर्व चित्रपट सुपरहिट होत गेले.
पण या बाबत त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंभाव व अहंकार उफाळून आला नाही.
उलट अमिताभ हा सुपरस्टार आहे म्हणल्यावर आपला चित्रपट साईन करेल का ? या विचारांनी मनात काहुर उठले होते . . .
▫काय करावे ? काय करु नये ? या विचारात आठ दिवस प्रकाश मेहरांचे मन सुन्न झाले होते, पण नंतर विचार केला की आपण एक फोन करुन तर पाहू . . .?
▫मनाची तयारी करुन प्रकाशजींनी अमिताभ बच्चन यांना फोन लावला . . .
फोन PA नी ऊचलला, आणि त्याने बच्चन साहेबांना फिल्म निर्देशक प्रकाश मेहरांचा फोन आहे असे सांगितले . . .
▫बच्चन साहेबांनी फोन घेतला व बोलायला सुरुवात केली . . .
▫समोरुन प्रकाश मेहरा :
"अमिताभजी माझ्याकडे नविन व अर्थपुर्ण स्क्रिप्ट तयार आहे आणि मला वाटते की, यातील मुख्य भुमिकेला फक्त तुम्हीच न्याय देवू शकता . . . !"
▫अमिताभ बच्चन यांनी काहीही उत्तर न देता फोनचा रिसीव्हर ठेवून दिला . . .
▫प्रकाशजी खुप नाराज झाले, त्यांना वाटले की, सुपरस्टार असल्याने बच्चनसाहेब खुप बिझी असणार? अन् आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसणार? म्हणूनच काहीही उत्तर न देता फोन ठेवला असावा . . .?
▪या प्रकाराने प्रकाशजींचे डोकं खुप जड झाले होते, त्यांनी पत्नीला चहा मागितला . . .
▫फोनच्या रिसीव्हरकडे एकटक नजर लावून प्रकाशजी चहा घेत होते . . .
▫अचानक दारावरच्या बेलचा आवाज खणखणला . . .
▫प्रकाशजी स्वत: उठले व दार घडण्यासाठी जड पावलांनी दार उघडण्यासाठी गेले . . .
🤔समोर बघतात तर काय?
▫दरवाज्यात फिल्म इंडस्ट्रीज मधील सुपरस्टार त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्यासह दोघे दांपत्य साक्षात हजर होते . . .
▪प्रकाशजींना प्रचंड आनंद झाला . . .
▪तोंडातुन शब्दही फुटेना . . .
▪आभाळ ठेंगने वाटायला लागले . . .
▪साक्षात परमेश्वरच आपल्या दारात उभे असल्याचा भास झाला . . .
▫प्रकाशजी व त्यांच्या पत्नीने दोघांचे आदराने स्वागत केले . . .
▪पाहुणचाराबरोबर चर्चा चालू झाली . . .
▫प्रकाश मेहरा नविन स्क्रिप्ट सांगू लागले . . .
▫तेवढ्यात अमिताभ बच्चन यांनी त्यांना थांबविले व म्हणाले की, "प्रकाशजी; तुम्हांला स्क्रिप्ट आवडली म्हणल्यावर मला सांगण्याचा प्रश्नच येत नाही . . .!"
"आत्ता लगेच अॅग्रीमेंट करुन घ्या व आज पासून तीन महिन्यात आपला चित्रपट रिलिज झाला पाहिजे अशा तयारीला लागा . . .!"
▫असे बोलून अमिताभ बच्चन यांनी सध्या चालू असणार्या चित्रपटांच्या निर्देशकांना लगेच फोन केले व सांगितले की, "मी तीन महिने आपल्या चित्रपटांचे शुटिंगसाठी उपलब्द होऊ शकणार नाही. आपले उर्वरीत शुटिंग तीन महिन्यांनंतरच सुरु होईल . . ."
▫प्रकाशजींनी वकील बोलावून डाॅक्युमेंटची व्यवस्था केली . . .
▪पण अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एक अट घातली . . .
▫अमिताभ बच्चन :
"आपला चित्रपट न थांबता सलग काम करुन चित्रपट तीन महिन्यात पुर्ण करु...!
पण त्यासाठीचे माझे मानधन मी स्वत: ठरविणार . . .
तुम्ही द्याल त्यात माझे समाधान होणार नाही . . .
▫प्रकाश मेहरा हे आधीच आर्थिक अडचणीत ? त्यात ही वेगळीच अट ? काय करावे काही समजेना ?
पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खुप गाजणार व सुपरहिटही होणार याची खात्री असल्याने त्यांनी लगेच हि अट सुध्दा मान्य केली . . .
▫सर्व डाॅक्युमेंट तयार झाले अन् सहीसाठी अमिताभ बच्चन यांच्यापुढे ठेवले . . .
▫अमिताभ बच्चन यांनी अॅग्रीमेंटवर आधी सह्या केल्या व मानधनाच्या जागी स्वत: रक्कम टाकली . . .
▪मित्रांनो; हि रक्कम होती फक्त *एक रुपया* . . .
👉🏻होय, *फक्त एक रुपयाच . . . !*
▪अजब आहे ना ?
👉🏻यालाच तर *कृतज्ञता* म्हणतात . . .
▫ज्या माणसांमुळे आपण सुपरस्टार झालो, तो माणूस आज अडचणीत आहे आणि त्यांना अडचणीतुन बाहेर येण्यासाठी आपली मदत होते म्हणल्यावर निस्वार्थपणे लगेचच पुढे होऊन समोरच्याला सावरण्यासाठी खुप मोठे मन व वाघाचे काळीज लागते . . .
▫प्रकाशजींनी अॅग्रीमेंट वरील रक्कम पाहिली व त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले . . .
▫प्रकाशजींनी उभे राहुन बच्चन साहेबांना मिटी मारली व एकदाचा बांध फुटला . . .
▫साक्षात माणसातला माणूसकी जपणारा भगवंत आज त्यांना सावरायला त्यांच्या घरी, त्यांच्या जवळ हजर होता . . .
▪मित्रांनो; येथे दोन्ही मातब्बर श्रेष्ठ म्हणावे लागतील . . .
▪कारण प्रकाश मेहरांनी जर पुर्वी चांगले काम केले नसते तर हा दिवस उजाडलाच नसता . . .
▫बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे *18 मे 1984* रोजी संपुर्ण देशभर सर्व चित्रपट गृहांमध्ये हा अनोखा व अायुष्याला कलाटनी देणारा चित्रपट रिलीज झाला आणि सुपर-डुपर हिट ठरला . . .
👉🏻हा अनोखा चित्रपट होता *________शराबी*
▪हाच तो चित्रपट ज्याने प्रकाश मेहरांच्या आयुष्याला नव कलाटनी देवून पुन्हा सोन्याचे दिवस आणले . . .
▫मला माहिती आहे की, मी थोडक्यात वाचलेली वा ऐकलेली हि कथा माझ्या शब्दशैलीत लिहिल्यामुळे एखाद्याला आवडेल किंवा नाही पण आवडणार . . . ?
▫पण मला मात्र *कृतज्ञता* या शब्दाच्या अर्थासाठी अगदी समर्पक वाटली म्हणून अवर्जून लिहिण्याचे धाडस केले आहे . . .
▫आयुष्यात आपणही असेच वागलो तर आपल्याही आयुष्याचे सोनं होईल असे मला मनोमन वाटते . . .
*👉🏻नाहीतरी या जन्मात दुसरे आहेच काय ?*
▫आपल्यामुळे जर एखाद्याचा संसार पुन्हा उभा राहत असेल तर यापेक्षा आपल्या आयुष्यातील पुंण्याचे काम दुसरे असूच शकत नाही . . .
▫म्हणून आपल्या बरोबर असणारांचा नेहमी आदर करा... त्यांना विश्वासाने जिंका, व त्यांनी केलेल्या उपकाराची जाणिव पावलो-पावली ठेवा . . .
▪आज *बलिप्रतिपदा* म्हणजे *दीपावली पाडवा*...
🔅आजच्या या नववर्षाच्या निमित्ताने सर्वांना खर्या अर्थाने *कृतज्ञता* या शब्दाची व्याप्ती समजावी व आत्मज्ञानाची प्रचिती होऊन दीवाळीचा हा सण खर्या अर्थाने साजरा व्हावा . . .
🔅आज दीवाळी पाडव्या निमित्त चुकलेल्यांना व संकट ग्रस्तांना तर चांगला व योग्य रस्ता दिसावाच परंतू चुकून आपल्यातलेच दुखावलेले, दुरावलेले आप्तजन पुन्हा एकत्र नांदावेत, आनंदात रहावेत
ही श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना
*🎉🎄🎁...हार्दिक शुभेच्छा...🎁🎄🎉*
*शुभं भवंतु ॥*
Comments
Post a Comment